Tuesday, August 28, 2012

पंचाईत



हल्ली ना माझी फार म्हणजे फारच पंचाईत होते ....
काय कराव आणि कसं वागावं हेच मला कळत नाहीये असं वाटायला लागतं ...

आता हेच बघा ना,  परवाची गोष्ट ... ऑफिस मध्ये नवीन कलिग ने जॉईन केलं , ती मुलगी इन्फी मधून आलेली .... आल्या आल्या मला विचारते , तुला गैजेट्स नाही का आवडत .... मी सरळ नाही म्हणालो तर माझ्याकडे "कोई मिल गया" मधल्या  जादू कडे बघावं तसं बघत नाक उडवून निघून गेली .... काय चुकलं माझं ??

आमच्या सोसायटी मधल्या (बिल्डींग हल्ली खूपच डाऊन मार्केट समजतात म्हणून सोसायटी ...) एका लहान मुलीला विचारलं कि तु शाळेत जाते का ... तर ती मला म्हणते कि मी शाळेत जायला काय मोठी आहे का ?? मी प्ले ग्रुप ला जाते .... च्यामारी, मराठी मध्ये शाळा म्हणालो तर मी गावंढळ का ??

खरं सांगू का ?? मला नाही आवडत रिमिक्स गाणी ऐकायला किंवा चेतन भगत ची पुस्तक वाचायला,,म्हणजे मला ते बिल्कूलच जमत नाही असा काही नाही .... कधी मूड लागला तर वाचतो पण ....
मी अस सांगितलं ना कि मला नाही आवडत हे सगळ, कि समोरच्या माणसाची नजर लगेच तिरस्कार का काय म्हणतात ते, त्याने भरून जाते ... (मुलगी असेल तर १० पट जास्तच)... मग होते पंचाईत ...
खरं सांगाव तर आपण बावळट ठरतो आणि खोटं बोलायची सोयच नाही ....

असाच मुंबई वरून एकदा येत होतो, समोर च्या सीट वर एक आजोबा बसले होते, बराच वेळ त्यांची चुळबुळ  चालली होती ... बर आपण काही बोलाव तर त्यांची नात त्यांच्या बरोबर होती .... असेल १५-१६ वर्षांची ( दिसायला पण बरी होती)... कानात इयरफोन लाऊन गाणी ऐकत होती ... आजोबा तसेच, अस्वस्थ .... शेवटी राहवेना म्हणून आजोबांना विचारलं "काही होतंय का तुम्हाला ?? काही हव आहे का ?"
इतक बोलायचा अवकाश ते घडाघडा बोलायला लागले ... किती साधं होतं ते बोलणं  , पण ऐकणारं कोणीतरी असावं इतकंच हवं होत त्यांना .... नात शेजारी असताना हि वेळ का येते ?? मी त्यांच्याशी बोलायला लागलो तर त्या मुलीने खूप विचित्र नजरेनी बघितलं .... थोडा  वेळ गप्पा मारून मी पण मग शांत बसलो ....
पण आत कुठे तरी काहीतरी हललं होतं  हे मात्र खरं ....
इथे पण माझंच काहीतरी चुकलं का??
मला तर नाही वाटत तसं .... मग माझीच अशी पंचाईत का होते ?? का तुमचं पण असंच होतं ??
तुम्ही द्याल का या प्रश्नाच उत्तर ??  टाळू शकता का तुम्ही अशी पंचाईत??

Wednesday, August 22, 2012

संताप, चीड, राग आणि निराशा...

आज इथे लिहिताना माझ्या मनात संताप, चीड, राग आणि निराशा दाटून आली आहे.... खर सांगायचं तर ती गेले ६ वर्ष अशीच दाटून येते....
आपण लोक इतके भावना आणि संवेदना शून्य कसे झालो हेच काळात नाहीये....
मुंबई वर अतिरेकी हल्ला झाला, आणि सगळा देश पेटून उठला... त्याच दिवशी आपले भावी पंतप्रधान पार्टी मध्ये मश्गुल होते.... आपण काय केले ?? काही नाही ......
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच नाटक बघून सगळे खुश झाले.... पण तेव्हाच मुख्यमंत्र्याला केंद्रात बढती मिळाली आणि मनात शंकेची पाल चुकचुकली....
परत परत किती वेळा संताप व्यक्त करायचा ??
या देशाचा राष्ट्रपती बलात्कार आणि खुनाच्या दोषींना माफी देतो.... प्रधानमंत्री हे तर वेगळच प्रकरण आहे.... बाजीराव पेशव्याच्या काळात भारतात निर्माण झालेल्या या पदाला आताच्या प्रधानामंत्र्यान  इतकी नालायक दुसरी व्यक्तीच नसेल....
सहकार्यांनी भ्रष्टाचार केला, हे गप्प... एका हेकेखोर मुख्यामंत्र्यापायी बांगलादेशला दुखावले तर तमिळ लोकांच्या भावनांसाठी श्रीलंके सारखा मित्र गमावला....
पाकिस्तान ने इतक्या उचापती करून पण आपण पुराव्यांच्या झेरॉक्स त्यांना देण्या पलीकडे काहीच नाही केले.... (फक्त स्कॅम वरून लक्ष हटवण्या साठी क्रिकेट खेळायला बोलावतोय त्यांना)...पुन्हा एकदा पाकिस्तानच्या कुरापती दिसून आल्या तरी आपण क्रिकेट खेळायला तयार ..... मुंबई मध्ये जे मारले गेले, शहीद झाले त्यांच्या बलिदानाची हि क्रूर थट्टा आहे असा कोणालाच नाही वाटत का ??

मध्ये वाटल होता कि अण्णा हजारे काहीतरी करतील.... या बधीर system ला हलवून सोडायची ताकत आहे त्यांच्यात.... पण हा हा म्हणता मुरलेल्या राजकारणी लोकांनी त्यांचा माकड केलं....
स्वतःच्या शक्तीची शिकार झालेल्या भास्मासुरासारखेच वाटले ते मला.... 

कायद्याची थट्टा  खुले आम सगळी कडे चालू आहे, आम्ही हताश पणे बघतोय....
परवाची गोष्ट....
आसाम मध्ये दंगल झाली आणि त्याला विरोध म्हणून मुंबई मध्ये सभा .... त्या नंतर माथेफिरू लोकांनी मोड-तोड जाळपोळ केली....
अरे कोण कुठले परदेशी लोक, त्यांच्या साठी तुम्ही आपल्या देशाच्या संपत्तीच नुकसान करता ??
धर्म मोठा का देश ??
आणि आपले गृह मंत्री काय करतात ?? तर ईद होई पर्यंत अटक करू नका म्हणून सांगतात... पोलिसांच्या संयमाच कौतुक करतात....
दिवसा ढवळ्या महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकला जातो.... ३०-४० जण त्यांना बाजारू स्त्रियांपेक्षा वाईट वागवतात... सगळ कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतंय... तरी कारवाई नाही ....
हाच का तो शिवरायांचा महाराष्ट्र ??

राष्ट्रवादी च नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी राष्ट्राचा विचार कधी केलाय का ??
आपले गृह मंत्री तर दिव्यच आहेत....
भुजबळ साहेबांनी भ्रष्ट करून सोडलेल्या गृह खात्याला निष्क्रियतेच वरदान दिलाय....  सत्ताधारी पार्टीच गुंडांच समर्थन करते.... ८-१० भ्रष्ट मंत्री आहेत सरकार मध्ये,..... आपण मात्र आनंदात आहोत....नुसते षंढ माणसासारखे बघत बसलोय.....

एका हवालदाराला पुढे येऊन राज ठाकरेंच अभिनंदन करावस वाटल...  त्याच्यावर कारवाई होईल हे माहित असूनही.... यातच सगळं नाही आलं का ??
मुलाचा सांभाळ जर बापच करू शकत नसेल तर मुलगा दुसरी कडे आसरा शोधतोच ना ??
आपण काय करतोय पण ?? तो हिंदू, हा मुसलमान इतकंच ?? आधी आपण भारतीय आहोत हेच कुठे तरी विसरत चाललो आहोत... आणि असा असेल तर काय फरक आहे रझा अकादमीच्या माथेफिरुंमध्ये आणि आपल्यात ??

आणि हे सगळं बदलायला काय करणार आपण ??
२०१४ ला तरी काहीतरी विचार करून मतदान करणार आहे का आपण ?? का २०१९ पर्यंत असाच स्वतःवर चिडत, आत मध्ये कुढत जगायचं ??

Friday, August 17, 2012

Shayari

बेचैन से दिल से गुजारीश क्या करे ?
दोस्तोन को बयान हाल-ए-दिल क्या करे ?
अगर मेहेरबान हो जाये दिलबर हमारा,
तो भला ये नादान शायरी क्या करे ??