Saturday, April 27, 2013

अब्रू - दिल्लीतली आणि घरातली

आज लिहावसं वाटलं काहीतरी परत एकदा.... कारण पण तसंच झाल...
ब्लॉग आणि फेसबुक वर महिलांवर होणाऱ्या अत्याचारा  विषयी  चीड व्यक्त होताना पाहिली … महिलांची अब्रू जपायला हवी हे सगळ्यांनाच पटतंय … मला पण … पण त्यांचा एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून आदर ठेवायला नको का ??

सरकारला शिव्या देणारे आणि बलात्कार करणार्यांना फाशी द्या म्हणणारे किती जण आपल्या घरी आपल्या आईला, पत्नी ला सन्मानाने वागवतात ??

6 महिने आधीचा एक प्रसंग आठवला ….
सकाळी सिंहगड पकडली आणि निघालो माझ्या वूड बी ला भेटायला मुंबई ला... सिंहगड चा एक डब्बा चिंचवड पासून सुरु होतो... रविवार म्हणून आमची स्वारी निवांत होती... आणि रिझर्वेशन वगैरे करून भारतीय रेल्वे ची रिकामी तिजोरी भरायचा कंटाळा आल्या मुळे ४९ रु चे तिकीट कडून अस्मादिक जनरल च्या डब्ब्यात ( रिझर्वेशनची बोगी आणि जनरलचा डब्बा हा फरक पण आपली क्लास सिस्टीम दाखवून जातो नाही ??) दाखल झाले....
आत चढायला माधुरी दीक्षित ला भेटायला होणार नाही इतकी गर्दी होती, आणि त्यातच एक बाई आपल्या २ वर्षाच्या मुलीला घेऊन आत चढायला धडपडत होती.... आणि ज्याची भीती वाटत होती तेच झालं.... गाडी थांबायच्या आधी धक्का-बुक्की करत चढणाऱ्या गर्दीने त्या बिचारीला असा धक्का दिला कि ती गाडीच्या आणि फलाटाच्या मधून पडलीच जवळ जवळ.... कशी बशी वाचली ती... दोघा तिघांनी हात दिला आणि आत चढली ति… . ती तिची मुलगी आणि तिचा नवरा... दारापाशीच बसकण मारली त्यनि…
मरण समोर पाहून आलेली तीचे हात पायच गळून गेले होते…  ... तिला एका म्हातारीने पाणी दिलं.... वाटलं सावरेल थोड्या वेळात....
तिच्या नवर्याने मात्र काही न पाहता जे काही आरडा ओरडा करायला सुरुवात केली... तिचा, तिच्या माहेरचा सगळ्यांचा मनसोक्त शिव्या घालून उद्धार केला..... आणि ती बिचारी काही न बोलता मुक्त मान गुढघ्यात घालून रडत बसली....
का??
इतक्या गर्दीत त्याने तिला आधार द्यायला नको होता का??
गर्दीने तिच्या स्त्रीत्वाचा नाही, पण जवळच्या लहान मुलीचा विचार करून तिला आधी जाऊ द्यायला नको होतं ??
पण नाहि…. चूक तीचिच … कारण ती एक स्त्री आहे…

खरच आपण इतकं गृहीत धरतो का स्त्री ला ?? स्वतःला विचारून बघा ना ....!!
किती वेळा आपण आपला राग आई वर काढतो ?? ती कधी बोलते आपल्याला ??
किती वेळा आपण बहिणीला ओरडतो , "तुला नाही कळत काही, गप्प बस...".... !!!!
हेच आपण बाबांच्या अंगावर ओरडू शकतो का ??

इतकं का सहन करतात सगळ्या स्त्रिया ... ??

खर सांगू ?? मला तर नेहमी हेच जाणवत आलाय कि आपण आपल्या समाजात योग्य स्थान नाही देत "बाई" ला....
नुसती त्यांची अब्रू वाचवली म्हणजे झालं का??
मन नावाचं काही नसतच ना ??

आठवून बघा … किती वेळा आपण प्रवासात एका खऱ्या  गरजू  बाईला जागा दिली आहे … (गरजू म्हणजे कॉलेज सुंदरी नव्हे )…
किती वेळा आई चे पाय दुखतात म्हणून चेपून दिले आहेत ?? चेपून द्यायचं राहूदे विचारायच तरी कधी लक्षात आलय का ?? नाही ना ??
कारण बायकांनी कामं करायचीच असतात … तडजोड त्यांनीच केली पहिजे…
आणि … त्यांना कशाला कधी काही विचारावं लागत… ?? आपण काही विचारपूस नाही केली तरी त्या काही संपावर जात नहित…

मुलगा तिशीत आला तरी चालत… पण मुलीचे हात पिवळे करायची घाई …. 
एखादीच  बाशिंगबळ जड असेल तर तिला बोलून इतके हैराण करणार कि बस ….

मुलाला स्वतःच्या  चड्डीची घडी घालायची अक्कल नसेल तरी चालत… पण मुलीने स्वयपाक जर बिघडवला कि तिच्या माहेरचा उद्धार सुरु…

आणि घरात स्त्रियांचा इतका  आदर (??)  सन्मान (??) करणारे जेव्हा दिल्लीतल्या अत्याचाराविषयी  बोलतात तेव्हा त्यांचा मानभावीपणा बघून तिडीक उठते ….

अब्रू तर जपली पहिजेच ओ …. पण त्याहून जपायला हव ते आपल्यातल माणूसपण , संवेदनाक्षम मन…


No comments:

Post a Comment